Posts

मुख्य संपादक : किशोर केणी   |   सहसंपादक : दिनेश चांगू मोरे   |   सहसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक.! 🚨
Image
खाद्यतेलाच्या नावाखाली डिझेल तस्करी करणाऱ्या आंतरराज्य माफियाचा पर्दाफाश! ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ४६.५ लाखांच्या मुद्देमालासह 'राजू पंडित' टोळीचे धागेदोरे उघड ठाणे, दि. ३१ (प्रतिनिधी) :- मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-१ आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा एक मोठा टँकर या पथकाने जप्त केला असून, या कारवाईत तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लोकांना फसवण्यासाठी संबंधित टँकरवर 'ईडीबल ऑईल' असे लिहिण्यात आले होते. गुन्हे शाखा घटक-१ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खारेगाव टोलनाक्याच्या अगोदर, मुंब्रा वळण रस्त्याजवळ सापळा रचून संशयास्पद टाटा कंपनीचा टँकर क्रमांक MH-46-BB-7134 थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रव पदार्थ आढळून आला. टँकर चालकाकडे या डिझेल सदृश पदार्थाची वाहतूक करण्याचा कोणताही परवाना, खरेदी बिल किंवा वैध कागदपत्रे नव्हती. प्रकरणा...
Image
लोणेरे येथील निर्घृण हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद! रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मुंब्र्यात धाडसी कारवाई रोहा-रायगड, दि. २६ (प्रतिनिधी) :-  ​रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये घडलेल्या एका भीषण आणि खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. १९ एप्रिल २०२६ रोजी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओमकार लॉजमधील रूम नंबर ०१ मध्ये अनिस मोहम्मदखान मालदार या ३८ वर्षीय आरोपीने एका महिलेच्या डोक्यात आणि हाताच्या मनगटावर कोयत्याने भीषण वार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता, ज्याचा शोध घेण्यासाठी रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम आखण्यात आली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आपल्या अनुभवी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक मजबूत तपास पथक तैनात केले होते. या विशेष मोहिमेत सहाय्यक पोलीस ...
Image
रोह्यात नदीकाठी जैविक कचऱ्याची बेकायदेशीर होळी! नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर रोहा (संदीप सरफळे) :- ​ रोहा शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जैव वैद्यकीय कचरा जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यातून निर्माण झालेल्या विषारी धुरामुळे परिसरातील रहिवाशांची मोठी घुसमट झाली आहे. नियमानुसार अशा घातक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे बंधनकारक असताना, अज्ञात घटकांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नदीकाठी हा कचरा पेटवून दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच खडबडून जाग आलेल्या नगर परिषदेने तातडीने पावले उचलत स्थानिक भंगार व्यावसायिक आणि नोंदणीकृत रुग्णालयांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही या घटनेची गांभीर्याने दखल घेत आज प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करणार आहेत. ​शहरात ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात असतानाच, थेट नदीकाठी सलाईनच्या बाटल्या, वापरलेल्या सुया, इंजेक्शनच्या काचेच्या बाटल्या आणि रक्ताने माखलेले का...
Image
रायगड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना आधार प्रमाणीकरण ई-केवायसी अनिवार्य रायगड (प्रतिनिधी) :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी (e-kyc) करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.  लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-kyc) करण्यार्कारता गावोगावी कॅम्प आयोजीत केले आहे. या करिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभाथ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी (e-kyc) करावयाचे आहे. सदरील प्रक्रिया दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करावयाची असल्याने लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठयाचा ठसा व आधार नंबर देऊन ई-केवायसो (e-kyc) करावी. ई-केवायसी (c-kyc) केले नाही, तर दिनांक १५ फेब्र...
Image
धाटाव एमआयडीसी येथील हॉयबाख कंपनीला भीषण आग रोहा (प्रतिनिधी) :- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धाटाव एमआयडीसीतील हॉयबाख कंपनीतील गोदामाला बुधवारी रात्री आठ वाजता भीषण आग लागली. साधारण दिड तास आगीचे तांडव सुरू होते. यावेळी साधारण १०० कामगार कंपनीत काम करत होते. तातडीने रोहा नगर परिषद आणि एमआयडीसी अग्निशमन दलाचे चार बंब आगीच्या ठिकाणी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कामगारांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. हॉयबाख कंपनी कापड, प्लास्टिक, छपाई आणि कृषी रसायन क्षेत्रासाठी रंगद्रव्ये आणि रंग तयार करते. दरम्यान, गोदामाला लागलेल्या भीषण आगीत कंपनीची मोठी वित्तहानी झाल्याची माहिती आहे.  कारखाना निरीक्षकाचा अंकुश नसल्याने धाटाव एमआयडीसीतील अपघाताच्या घटना सुरूच आहेत. सप्टेंबर महिन्यात साधना कंपनीत झालेल्या स्फोटात चार तरुण कामगारांनी जीव गमावला. मात्र कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी कंपनी म्हणून ख्याती असलेल्या हॉयबाख कंपनीच्या गोदामाला आग लागल्याने धाटाव एमआयडीसीत कोणीही सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले. ह्या...
Image
राज्यातील हवाई दळणवळण वाढविण्यासाठी विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचे विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरुपाचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात हवाई वाहतुकीच्या वाढीला मोठा वाव आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या उडाण योजनेसह राज्याच्या निधीतून विमानतळांचा विकास, त्यांचे विस्तारीकण, नाईट लँडिंगची सुविधा, धावपट्टीची लांबी वाढविणे, विमानतळांवर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे. ...
Image
आदर्श शिक्षक हेमंत सारदल यांची चेअरमन पदावर बिनविरोध निवड महाड (स्मरणिका साळुंखे) :- महाड तालुक्यातील अप्पर तुडील शाळेचे मुख्याध्यापक हेमंत सारदल यांची महाड तालुका शिक्षक पतपेढीच्या चेअरमन पदावर बिनविरोध निवड झाली. याबद्दल माजी चेअरमन संजय कोंडविलकर, तालुका अध्यक्ष सचिन खोपडे, वसंत दासगावकर, नवनाथ पवार, विजय जाधव देठे, शिक्षक नेते भिकाजीराव मांढरे, संजेश साळुंखे, समीर होडबे, वसंत साळुंखे यांनी भेटून अभिनंदन केले. सर्व शिक्षकांना सोबत घेऊन पतपेढीचा आलेख उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवीन असे उदगार हेमंत सारदल सर यांनी काढले.