Posts

ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
Image
रायगड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना आधार प्रमाणीकरण ई-केवायसी अनिवार्य रायगड (प्रतिनिधी) :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी (e-kyc) करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.  लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-kyc) करण्यार्कारता गावोगावी कॅम्प आयोजीत केले आहे. या करिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभाथ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी (e-kyc) करावयाचे आहे. सदरील प्रक्रिया दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करावयाची असल्याने लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठयाचा ठसा व आधार नंबर देऊन ई-केवायसो (e-kyc) करावी. ई-केवायसी (c-kyc) केले नाही, तर दिनांक १५ फेब्र...
Image
धाटाव एमआयडीसी येथील हॉयबाख कंपनीला भीषण आग रोहा (प्रतिनिधी) :- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धाटाव एमआयडीसीतील हॉयबाख कंपनीतील गोदामाला बुधवारी रात्री आठ वाजता भीषण आग लागली. साधारण दिड तास आगीचे तांडव सुरू होते. यावेळी साधारण १०० कामगार कंपनीत काम करत होते. तातडीने रोहा नगर परिषद आणि एमआयडीसी अग्निशमन दलाचे चार बंब आगीच्या ठिकाणी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कामगारांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. हॉयबाख कंपनी कापड, प्लास्टिक, छपाई आणि कृषी रसायन क्षेत्रासाठी रंगद्रव्ये आणि रंग तयार करते. दरम्यान, गोदामाला लागलेल्या भीषण आगीत कंपनीची मोठी वित्तहानी झाल्याची माहिती आहे.  कारखाना निरीक्षकाचा अंकुश नसल्याने धाटाव एमआयडीसीतील अपघाताच्या घटना सुरूच आहेत. सप्टेंबर महिन्यात साधना कंपनीत झालेल्या स्फोटात चार तरुण कामगारांनी जीव गमावला. मात्र कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी कंपनी म्हणून ख्याती असलेल्या हॉयबाख कंपनीच्या गोदामाला आग लागल्याने धाटाव एमआयडीसीत कोणीही सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले. ह्या...
Image
राज्यातील हवाई दळणवळण वाढविण्यासाठी विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचे विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरुपाचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात हवाई वाहतुकीच्या वाढीला मोठा वाव आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या उडाण योजनेसह राज्याच्या निधीतून विमानतळांचा विकास, त्यांचे विस्तारीकण, नाईट लँडिंगची सुविधा, धावपट्टीची लांबी वाढविणे, विमानतळांवर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे. ...
Image
आदर्श शिक्षक हेमंत सारदल यांची चेअरमन पदावर बिनविरोध निवड महाड (स्मरणिका साळुंखे) :- महाड तालुक्यातील अप्पर तुडील शाळेचे मुख्याध्यापक हेमंत सारदल यांची महाड तालुका शिक्षक पतपेढीच्या चेअरमन पदावर बिनविरोध निवड झाली. याबद्दल माजी चेअरमन संजय कोंडविलकर, तालुका अध्यक्ष सचिन खोपडे, वसंत दासगावकर, नवनाथ पवार, विजय जाधव देठे, शिक्षक नेते भिकाजीराव मांढरे, संजेश साळुंखे, समीर होडबे, वसंत साळुंखे यांनी भेटून अभिनंदन केले. सर्व शिक्षकांना सोबत घेऊन पतपेढीचा आलेख उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवीन असे उदगार हेमंत सारदल सर यांनी काढले.
Image
77 व्या निरंकारी समागमाच्या सेवांचा विधिवत शुभारंभ सेवेमध्ये कोणताही भेदभाव न बाळगता ती निष्काम भावनेने करावी - सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज महाड (स्मरणिका साळुंखे) :- या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. त्यांची भाषा, वेशभूषा, आहार, जात, धर्म, संस्कृती वेगवेगळे आहे. या सगळ्या विभिन्नता असूनही आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे आपण सर्व मनुष्य आहोत. आपला वर्ण कोणताही असो, वेशभूषा कशीही असो, देश कोणताही असो किंवा खाणे-पिणे कसेही असो; सर्वांच्या धमण्यांमध्ये एकसारखेच रक्त वाहत आहे आणि सगळे एकसारखाच श्वास घेत आहेत. आपण सर्व परमात्म्याची लेकरं आहोत. हीच भावना अनेक संतांनी वेगवेगळ्या समयी आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या भाषेतून आपापल्या शैलीमध्ये ‘समस्त संसार, एक परिवार’ या संदेशाच्या रूपात व्यक्त केली.  मागील सुमारे 95 वर्षांपासून संत निरंकारी मिशन हाच संदेश केवळ प्रेषित करत आहे इतकेच नव्हे, तर अनेक सत्संग आणि समागमांचे नियमितपणे आयोजन करुन या संदेशाचे जीवंत उदाहरण प्रस्तुत करत आहे. मिशनचे लक्षावधी भक्त यावर्षीही 16, 17 आणि 18 नोव्हेंबर, 2024 रोजी संत निरंकारी आध्यात...
Image
खाडीपट्टयामध्ये इंटरनॅशनल स्कूलची मुहूर्तमेढ रोवली  पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्थेने चिंभावेत केले भूमिपूजन महाड (स्मरणिका साळुंखे) :- महाड तालुक्यातील चिंभावे बौद्धवाडी येथे सीबीएसई बोर्डचे नर्सरी ते बारावी आर्ट्स, कॉमर्स व सायन्स आणि आयटी विभाग वस्तीगृह इमारतीचा तसेच नियोजित शाळेचा शुभारंभ भूमिपूजन व शाळेच्या नियोजित इमारतीच्या फलकाचे अनावरण माजी आमदार तथा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट अध्यक्ष डॉ. जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य सुधाकर खैरे सरांनी उचललेले हे पाऊल यशस्वी होणारच असे उपस्थितांसमोर प्रतिपादन केले. चिंभावे येथील सुपुत्र पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्था कल्याण मुंबई या संस्थेचे अध्यक्ष तसेच माजी प्राचार्य सुधाकर खैरे सर यांनी रविवारी चिंभावे बौद्धवाडी येथे स्वतःच्या मालकीची अडीच एकर जमीन नियोजित शाळेकरिता देणगी देऊन सदर वस्तीगृह इमारतीचा नियोजित शाळेचा शुभारंभ व शाळेच्या नियोजित इमारतीच्या फलकाचे अनावरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उ...
Image
पोयनाड येथील तलावावर जेएसडब्ल्यु कंपनीच्या निकामी स्लॅगचा भराव, ग्रामस्थांचा विरोध पेझारी/रायगड (मुजाहिद मोमीन) :- ग्रुप ग्रामपंचायत पोयनाड आणि आंबेपुर हद्दीतील तलावावर जेएसडब्ल्यु कंपनीच्या निकामी केमिकल स्लॅगचा भराव करण्यात येत आहे. या प्रकाराला ग्रामस्थांच्या वतीने निलेश चवरकर यांनी विरोध केला आहे.  येथील तलावावर भराव करताना जेएसडब्ल्यु कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता, कंपनीचा निकामी झालेल्या विषारी व धोकादायक स्लॅगचा भराव करण्यात आलेला आहे. या विषारी स्लॅगच्या भरावामुळे तलावातील मासे मृत होण्याचा धोका तसेच तिथे येणारी लोकं जे त्यात कपडे धुतात व तेथील ग्रामस्थांची मुले त्यात (पोहतात) अंघोळ करतात त्यांना रोगराईचा सामना करावा लागू शकतो. त्याची जवादारी कोण घेईल? संबंधित शासकीय अधिकारी घेतील की कॉन्ट्रॅक्टर घेतील? की ठेकेदार घेतील? असा प्रश्न निलेश चवरकर यांनी उपस्थित केला आहे. तलवाचे पाणी इतर कामासाठीही वापरले जाते आणि या विषारी स्लॅगच्या भरावने नवीन झाडं झुडपे होतील का किंवा जगतील का? अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या असून फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी ठेकेदारांनी ग्रामस्थ...